केस गळण्याची कारणे

hair loss ttreatment vishwa swasthya ayurveda

१) डोक्यावरुन कडक पाण्याने आंघोळ करणे.

२) बोअरचे पाणी पिण्यासाठी अथवा आंघोळीसाठी वापरणे.

३) रोज केस ओले करणे.

४) शाम्पू – शाम्पूचा जास्त वापर करणे, नवनवीन शाम्पूचा वापर करणे.

५) केसांना तेल अजिबात न लावणे अथवा कमी प्रमाणात लावणे.

६) उपवास व डायटिंग अधिक प्रमाणात करणे.

७) दिवसा झोपणे व रात्री जागरण करणे.

८) चहा, कॉफ़ी, कोल्ड्रींक्स, फ़ास्ट फ़ूड, जंक फ़ूड, जास्त सेवन करणे.

९) शिळे अन्न पदार्थ खाणे.

१०) आंबट – दही, लिंबु, चिंच, पाणीपुरी, लोणचे, इ.चा वापर जास्त प्रमाणात करणे.

११) तिखट – मिरची, ठेचा (खर्डा), सर्व प्रकारच्या चटण्या, तिखट पदार्थांचा वापर अधिक करणे.

१२) खारट – मीठ व अधिक मीठ असलेले पदार्थ (कुरकुरे, चिप्स, वेफ़र्स, खारे शेंगदाणे) यांचा वापर अधिक प्रमाणात करणे.

१३) मेहंदी व हेअर डाय, हेअर कलर चा वापर अधिक प्रमाणात करणे.

१४) शारीरिक आजार – अम्लपित्त, पचनविकार, उष्णता, हाडी ताप, अजीर्ण, पोटाचे आजार, ढेकरा, गॅसेस, नियमित पोट साफ़ न होणे, त्वचा रोग, रक्ताचे प्रमाण कमी असणे, काविळ, टायफ़ॉईड, पाळीच्या तक्रारी, अंगावरुन पांढरे / लाल जाणे, गर्भाशयाचा आजार, इ.

१५) मानसिक आजार- मानसिक ताणतणाव, चिडचिडेपणा, स्ट्रेस, टेन्शन, निद्रानाश, डिप्रेशन, फ़्रस्ट्रेशन, इ

१६) पुरुषांमध्ये –गाडीवर प्रवास करणे, सर्व प्रकारची व्यसने ( तंबाखु, गुटखा, दारु, सिगारेट ) धातुक्षय (ब्रह्मचर्य पालन न करणे )

१७) आहार- आहारमध्ये दूध व तुपाचा वापर कमी प्रमाणात करणे अथवा अजिबात नसणे. पालेभाज्य, फ़ळे न खाणे, माती, खडू, इ. सतत खाणे.

१८) मांसाहाराचे सेवन अति प्रमाणात करणे.

वरील सर्व कारणांमुळे शरीरामध्ये रोज उष्णता, क्षार, विषारी तत्वे तयार होतात. ती रक्तामध्ये मिसळून केसांच्या मूळाशी जातात व त्याचा परिणाम केस गळणे, कोंडा होणे, केस पांढरे होणे, केसांचे पोषण न होणे, केसांची मुळे बंद होणे इत्यादिवर होतो. त्यामुळे अकाली, कमी वयामध्ये केस पिकतात व टक्कल पडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.






    ×

    Hello!

    Click below to chat on WhatsApp

    × How can I help you?