<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>Virechan &#8211; Shree Vishwa Swasthya Ayurveda</title>
	<atom:link href="https://vishwaswasthya.com/category/panchakarma/virechan/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://vishwaswasthya.com</link>
	<description>Best Ayurveda Clinic In Nigadi</description>
	<lastBuildDate>Wed, 20 Oct 2021 13:10:46 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=5.8.13</generator>
	<item>
		<title>अम्लपित्त सध्याचा ज्वलंत प्रश्न</title>
		<link>https://vishwaswasthya.com/acidity/</link>
		
		<dc:creator><![CDATA[Admin]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 23 Oct 2020 12:23:36 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Virechan]]></category>
		<guid isPermaLink="false">http://vishwaswasthya.co.in/?p=7598</guid>

					<description><![CDATA[आपण सध्या बघतो पैसा, काम, संसार, टेन्शन, जबाबदारी व संघर्षमय व धावपळीचे झाले आहे. प्रत्येक मनुष्य सध्या तणावग्रस्त जीवन व [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>आपण सध्या बघतो पैसा, काम, संसार, टेन्शन, जबाबदारी व संघर्षमय व धावपळीचे झाले आहे. प्रत्येक मनुष्य सध्या तणावग्रस्त जीवन व त्यामुळे व्याधीग्रस्त झालेले शरीर घेवून जीवन संघर्ष करीत असलेला दिसतो. अशा स्पर्धात्मक युगात Hurry (धावपळ), Curry (मसालेयुक्त आहार ), Worry (चिंता) प्रत्येक व्यक्तीमध्ये अम्लपित्त (Acidity) निर्माण करत असल्याचे दिसून येते. त्यासाठी अनेक प्रकारची Antacids घेवून फ़रक पडत नाही. पुढे एन्डोस्कोपी व अन्य तपासण्या चालू राहतात. तेव्हा पर्यायी उपचार पद्धती म्हणून लोक आयुर्वेदाकडे येतात.</p>



<p>आयुर्वेदामध्ये अम्लपित्तासाठी अतिशय परिणामकारक औषधी व विरेचनासारखे दीर्घकाळ उपशय देणारे उपचार सांगितलेले आहेत. अम्लपित्त होण्यासाठी मुख्य कारण असते ते म्हणजे अनियमित आहार- विहार म्हणून निदान परिवर्जन करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणे गरजेचे असते. सकाळी लवकर उठावे. सकाळी १ कप दूधात १ चमचा साजूक तूप टाकून घेणे. सकाळी भाजी पोळीचा नाष्टा व दुपारी १२ वा. जेवण, पुन्हा सायंकाळी ७ च्या आत जेवण घेणे व रात्री लवकर झोपणे. झोपण्यापूर्वी शक्य झाल्यास दुध तूप घेणे. आहारातून अतितिखट, आंबट, तळलेले, खारट पदार्थ, दही, लिंबू, लोणची, काळा मसाला, हरभरा, तूरडाळ, बाजरी, अतिप्रमाणात चहा घेणॆ वर्ज्य केल्यास कुठल्याही औषधाविना रुग्णास उपशय मिळतो. मात्र काही व्यक्तिंमध्ये कारण नसताना चिंता / टेन्शन घेणे हे देखील मुख्य कारण असते. अशा व्यक्तिंनी ’निर्लज्जम् सदासुखी’ या मंत्राचे अनुकरण करणे म्हणजे चिंताविरहित राहणे फ़ायदेशीर ठरते अम्लपित्त असलेले अनेक लोक रोज सकाळी पाणी पिऊन उलटी करतात. पण हि चुकिची पद्धत आहे. कारण पित्ताची शुद्धी विरेचनानेच ( जुलाबाद्वारे) झाली पाहिजे. अन्यथा रोजच्या उलटीमुळे व अम्लपित्तामुळे अन्ननलिकेस इजा होऊ शकते. १५ दिवसातून एकदा जुलाब – <strong>विरेचन</strong> घेतले तरी दीर्घकाळ त्याचा फ़ायदा झालेला दिसून येतो. त्यासाठी आयुर्वेदिक वैद्याचे मार्गदर्शन उपयुक्त. शास्त्रोक्त पद्धतीने <strong>विरेचन</strong> नावाचे पंचकर्म करुन घेतल्यास अशुद्ध् पित्ताची मोठ्या मात्रेने शुद्धी होते म्हणून अम्लपित्तासाठी <strong>विरेचन</strong> घेणे श्रेयस्कर.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>वातविकार आणि विरेचन चिकित्सा</title>
		<link>https://vishwaswasthya.com/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%bf/</link>
					<comments>https://vishwaswasthya.com/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%bf/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Admin]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 23 Oct 2020 12:11:03 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Virechan]]></category>
		<category><![CDATA[वातविकार]]></category>
		<guid isPermaLink="false">http://vishwaswasthya.co.in/?p=7593</guid>

					<description><![CDATA[अनियमित आहार-विहार, सततचा प्रवास, टेन्शन यामुळे पित्ताप्रमाणेच वातदोषाचाही प्रकोप होत असल्याने वातदुष्टीचे संधिवात, कंबरदुखी, डोकेदुखी, लकवा (Paralysis) असे पेशंट दिवसेंदिवस [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>अनियमित आहार-विहार, सततचा प्रवास, टेन्शन यामुळे पित्ताप्रमाणेच वातदोषाचाही प्रकोप होत असल्याने वातदुष्टीचे संधिवात, कंबरदुखी, डोकेदुखी, लकवा (Paralysis) असे पेशंट दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. संधिवातने ग्रस्त असलेले रुग्ण फ़रक पडत नाही म्हणून सतत डॉक्टर बदलत राहतात व अखेर सतत आजाराच्या चिंतेने ग्रस्त असतात. संधिवाताने ग्रस्त असलेले रुग्ण पोट साफ़ असले की बरे वाटते, वेदना कमी वाटतात असे म्हणताना दिसतात. वाताची निर्मिती अन्नपचनच्या शेवट्च्या भागात म्हणजे मोठ्या आतड्यात जेथे मलाची निर्मिती होते तेथेच होते. अपचनातून तयार होणारा वात खराब तयार होतो आणि हा दुष्ट झालेला वात सांधे, मांसपेशी, मणके याठिकाणी स्थानसंश्रय करतो (आश्रय घेतो ) त्यावेळी सांधेदुखी, हातपायाच्या शिरा आखडणे, हातापायांमध्ये टोचल्याप्रमाणे वेदना होणे, हात पाय किंवा शरीरातील एखाद्या ठिकाणी सुंधपणा जाणवने अशी निरनिराळी लक्षणे दिसू लागतात. अपचनातून तयार झालेला खराब वात हा वातविकाराचे प्रमुख कारण असतो. त्यासाठी बद्धकोष्ठता हे एक प्रमुख कारण सांगितलेले आहे. म्हणून त्यावरची मुख्य चिकित्सा ’बस्ति’ सांगितली आहे. त्याबरोबर <strong>मृदुविरेचन</strong> हे देखील सांगितले आहे. (स्नेह: स्वेद: संशोधनं मृदु ।)</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://vishwaswasthya.com/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%bf/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>त्वचाविकार आणि विरेचन</title>
		<link>https://vishwaswasthya.com/skin-disease-and-virechan/</link>
					<comments>https://vishwaswasthya.com/skin-disease-and-virechan/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Admin]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 23 Oct 2020 12:08:07 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Virechan]]></category>
		<category><![CDATA[Skin Care]]></category>
		<category><![CDATA[त्वचाविकार]]></category>
		<guid isPermaLink="false">http://vishwaswasthya.co.in/?p=7591</guid>

					<description><![CDATA[सोरियासिस (Psoriasis), दाद (Fungal Infection), इसब (Eczema) ,पांढरा कोड (Leucoderma), अंगावर पित्त उठणे (Urticaria) यासारखे अनेक प्रकारचे त्वचारोग हल्ली व्यवहारात [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>सोरियासिस (Psoriasis), दाद (Fungal Infection), इसब (Eczema) ,पांढरा कोड (Leucoderma), अंगावर पित्त उठणे (Urticaria) यासारखे अनेक प्रकारचे त्वचारोग हल्ली व्यवहारात पाहायला मिळतात. आयुर्वेदानुसार त्वचाविकार हे मुख्यत: रक्तदुष्टीमुळे होतात. रक्तदुष्टी होण्यामागे अनियमित आहार- विहार, आंबट, खारट, तिखट, विदाही, शिळे अन्नसेवन, रात्री जागरण करणे, दिवसा जेवून लगेच झोपणे ही पित्त बिघडवणारी कारणे जबाबदार असतात. कारण आपल्या शरीरात पित्त हे रक्ताच्या आश्रयाने राहाते. अशाप्रकारे दुष्ट झालेले रक्त, पित्त, क्लेद हे त्वचेमध्ये जावून खाज येणे, त्वचेचा रंग बदलणे, त्वचेवर जखमा होणे, पू येणे, पाणी येणे अशी निरनिराळी लक्षणे वात, पित्त, कफ़ यांच्या अधिक्यानुसार निरनिराळी लक्षणे निर्माण करतात. त्वचाविकारांत प्रामुख्याने पित्त व रक्त यांची दुष्टी आढळून येत असल्याने त्वचेच्या आजारात <strong>विरेचन</strong> <strong>व</strong> <strong>रक्तमोक्षण</strong> हे पंचकर्मातील उपचार त्वचाविकारांचा नाश करणारे, आरोग्य, आयुष्य संवर्धित करणारे ठरतात. याचसोबत विविध आयुर्वेदिक लेप सुद्धा उपयोगी ठरतात.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://vishwaswasthya.com/skin-disease-and-virechan/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>विरेचन म्हणजे काय ?</title>
		<link>https://vishwaswasthya.com/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af/</link>
					<comments>https://vishwaswasthya.com/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Admin]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 23 Oct 2020 12:05:14 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Virechan]]></category>
		<guid isPermaLink="false">http://vishwaswasthya.co.in/?p=7589</guid>

					<description><![CDATA[विरेचन म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने करविलेला जुलाब होय. शरीरात वाढलेला पित्त दोष जुलाबाद्वारे शरीराच्या अधोमार्गाने बाहेर काढून टाकणे म्हणजे विरेचन (Laxation) [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>विरेचन</strong> म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने करविलेला जुलाब होय. शरीरात वाढलेला पित्त दोष जुलाबाद्वारे शरीराच्या अधोमार्गाने बाहेर काढून टाकणे म्हणजे <strong>विरेचन</strong> (Laxation) होय. <strong>विरेचन</strong> हे लहानांपासून वृद्धांपर्य़ंत ऋतुनुसार शारीरिक बलानुसार, अवस्थेनुसार व आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेता येऊ शकते. शास्त्रोक्त पद्धतीने <strong>विरेचन</strong> करण्यासाठी विरेचनापूर्वी वर्धमान मात्रेत म्हणजे वाढत्या मात्रेत औषधानी सिद्ध केलेले तूप (घृतपान ) घेण्यास सांगितले आहे. म्हणजे त्यामुळे जठर, आतड्यांना स्नेहनाचे ( मालीश – Lubrication ) कार्य होऊन विरेचनाच्या औषधाने शरीरातील दोष विनासायास बाहेर निघून जाण्यास मदत होते. हे आभ्यंतर स्नेहन ३ दिवस, ५ दिवस अथवा ७ दिवस रुग्णाच्या कोठ्यानुसार – पचनशक्तिनुसार केले जाते. अशा पद्धतीने शरीर आतून स्निग्ध झाल्यानंतर २-३ दिवस शरीराला बाहेरुन स्निग्ध करण्यासाठी मालीश वाफ़ ( स्नेहन स्वेदन ) केली जाते. त्यानंतर रुग्णाच्या आजारानुसार, प्रकृतीचा, बलाचा, ऋतुचा विचार करुन विरेचनाचे औषध दिले जाते. <strong>विरेचना</strong>मुळे जुलाब होत असले तरी यामध्ये शरीर जुलाबासाठी तयार करुन त्यानंतर जुलाब करविले जातात. त्यामुळे शरीरात जुलाबानंतर (विरेचनानंतर) थकवा न येता शरीर हलके होते.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://vishwaswasthya.com/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
